पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मृतींचा हिंदोळा

इमेज
दिवेलागणीची वेळ. एका शांत संध्याकाळची उतरती उन्हे. संध्याप्रकाशाचे कवडसे सांभाळत झाडाची पाने एक एक कवडसा अलगद हलवून लाकडी गजाआड सांडत राहिलेली. लहानपणी आजी बसायची त्या व्हरांड्यात लाकडी गज समोर बाजूला होते आणि आतल्या बाजूला दोन आरामखुर्च्या - त्यातली एक लहान, एक मोठी - समोरासमोर गजांना लागून ठेवलेल्या असत. उरलेल्या जागेत आणखी दोन खुर्च्या असत. त्या जरा भक्कम पण लाकडीच होत्या. हिरव्या रंगाचे जाड कापड आणि आत स्प्रिंग आणि भुसा भरलेला अशा. ह्या दोन खुर्च्यांवर बसले की त्या स्प्रिंगमुळे वाजायच्या आणि आमचा आपला एक खेळ व्हायचा. एका खुर्चीवर आजीची मनीमाऊ, तिचे नाव पेशवीण, अगदी बिनधोक बसलेली असायची. तिला एक हक्काची मऊ उशी आजीने बसायला दिली होती. अगदी शांत निद्रेत गहन विचार करत असल्यागत दिसायच्या पेशवीण बाई! आज त्या व्हरांड्यात उभे राहून समोर पाहताना सगळे आठवत आहे. दुपारी आरामखुर्चीत बसून आजीचे स्त्री आणि किर्लोस्कर ह्या मासिकांचे वाचन चालायचे. तिच्या वाचनात शक्यतो खंड पडायचा नाही. बाहेर रस्त्यावर काही ठराविक आवाज येत. बैलगाडीच्या चाकांचा, रस्त्यावरून जाण्याऱ्या गाईंच्या हंबरण्याचा, लां...

'मन्या द वंडर बॉय'

इमेज
               'मन्या द वंडर बॉय',नावात सगळे आले आहे का?  पहायलाच  हवं...म्हणून चित्रपट पाहू लागले आणि सर्व वयोगटातील व्यक्तींनी पहावा असा हा  मराठी  चित्रपट,शेवटपर्यंत मला  माझ्या  जागेवरून उठू देईना! एका गावात लहानगा मन्या (रीशीराज पवार ), त्याचे  आई वडील आणि बहिणीसोबत, रहात   असतो. मन्या आठवीत,शाळेत जाण्यास उत्सुक पण घरात बिछान्याला खिळलेले वडील त्यामुळे घरातली कामे देखील हिरहिरीने करत असतो.घरात गाई आणि दुधदुभते.बहिण आणि तो आईला मदत करून मग शाळेत जात असतात. दुग्धालयात  दुध पोहोचवून शाळेत जाईस्तोवर नेहमी होणारा उशीर,आणि त्यामुळे शाळेत होणारे हसे,अपमान पचवणारा बोलक्या डोळ्यांचा मन्या.मन्याचा मित्र 'ओम्या'नेहमी मन्याला सांभाळून घेणारा,वेळी अबोला धरणारा पण मदत करणारा,आणि 'जाई' जिच्या आयुष्यात खूप लहान वयात आई वडिलांचे छत्र हिरावले जाते आणि काकांच्या घरी आधाराला राहिलेली अशी हि मन्याची मैत्रीण.मन्याला शाळेत उशीर होऊ नये म्हणून बाबा,आणि बहिण मिळून त्याच्यासाठी एक पाठीवर लावायची पिशवी शिवतात,हात रिकामे ...

रामेश्वराच्या सान्निध्यात .....

इमेज
                रामेश्वराचे आवार डोळ्यासमोर उभे राहिले आहे.आज का कोण जाणे,सकाळपासून ह्या देवालयाची आठवण येते आहे.आठवण स्वस्थ बसू देत नाही आणि तिला जिवंत व्हायचे असते कागदावर!  शांत हिरवळीने नटलेले कोकणातले रेवदंडा आणि आसपासचा परिसर,,निसर्गाने दिलेले वरदान.गावापासून थोड्याच अंतरावर चौल फाट्याजवळ हे देऊळ आहे.पुरातन असे हे देवालय आजही डोळ्यांसमोर येते.किती वेळा बालपणी ह्याच्या आवारात गेले आहे.समोरची पोखरण,त्याच्या भोवती वसलेली कौलारू घरे आणि पाठी नारळी पोफळीची झाडे,आजही,वाऱ्याने हलता डूलताना,आता डोळे मिटले तर दिसत आहेत.ह्या देवळात प्रत्येक मुख्य सणाला लहान मोठे कार्यक्रम असत.देवळासमोर दीपमाळा होत्या.मुख्य श्री शंकराचे स्थान आणि मग लहान अश्या काळ्या दगडातल्या विठ्ठल रखुमाई,राम सीता,ह्या दैवतांच्या मुरत्या आहेत.देवळाच्या पायऱ्या उतरताना दोन्ही बाजूला बैठक आहे जिथे पांथस्थ मंडळी विसावतात.          बालपणी हे देऊळ खूपच मोठे,अवाढव्य भासायचे.देवळाचा आतला भाग,घुमट,शिवाचे स्थान आणि त्या गाभाऱ्यातल...

एक संवेदनशील कलाकृती!

इमेज
                    एक लहानस गाव.गावात यशोदेचे लहानसे घर.घरासमोर विहीर आणि गोठ्यात गाय आणि वासरू...यशोदा गरीब पण स्वाभिमानी.स्वतःचे मूल नसताना प्रेमाने सवतीच्या मुलीचे,सुरेखाचे करणारी,तिच्या आजारासाठी ऑपरेशनचे पैसे जमवण्यासाठी खूप मोठा निर्णय घेऊन बसते.यशोदेचा नवरा तिला सोडून निघून गेलेला असतो. शेतात कष्ट करून आपले आणि सुरेखाचे करणारी यशोदा मोठ्या जिद्दीची दाखवली आहे.मेरी नावाची एक गोरी आणि तिचा नवरा परदेशातून भारतात येतात.बाळंतपणाची भीती आणि सौदर्य कमी होते म्हणून स्वतःच्या गर्भात हे बाळ मोठे न करता यशोदाला हि जबाबदारी देणारी गोरीपान सोनेरी केसांची मेरी यशोदाला समजून घेण्यासाठी तिच्यासोबत तिच्या घरी राहते.डॉक्टर बाई यशोदाला सगळे काही व्यवस्थित समजावून देतात.'सरोगेट मदर' म्हणजे काय हे जाणून घेऊन फक्त स्वतःच्या लेकीसाठी,इतकी मोठी गोष्ट करायला तयार झालेली यशोदा,मेरी सोबत देशाबाहेर न जाता स्वतःच्या घरातच राहण्याचा निर्णय घेते आणि मेरीला,अनेक गोष्टी नव्याने शिकवते...मेरीचा नवरा परत जातो पण मेरी मात्र माघारी यशोदा सोबत म्हणजे अर्थात,यशोद...

काही खटकलेले..

        मनात आलेले खूप दिवस मांडायचे राहून जात होते मग अगदी ठरवून आज काही मनात बोचणारे लिहायचे ठरवले.तसे आणखीनही विषय आहेत पण जे ह्या गेल्या काही दिवसात जास्ती जाणवले ते इथे मांडते आहे.           काव्य आणि विनोद ह्याहून वेगळे,थोडेसे जाणवणारे,कुठेतरी खोल रूतणारे आणि प्रश्न निर्माण करणारे काही....आणि काही अनुभवातून जाणवलेले सत्य.         'कोरडेपणा जगातला वाढत जातो आहे' अगदी 'खटखटीत कोरडेपण'.सगळीकडे उन्नती असूनही असूया जास्त दिसते.सतत एकमेकांशी स्पर्धा करत राहणे म्हणजे प्रगती आहे का?       अपेक्षा मग त्या अर्थार्जनाच्या असोत किंवा आणखीन कोणत्याही त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर माणसाला स्थैर्य नाही.मुलभूत गरजा भागून पूर्वी मंडळी खुश असत...किंवा तसा प्रयत्न असे..पण आज गरजा आपला जबडा विस्तारत जात आहेत...आणि माणूस त्यामुळे पूर्णपणे त्या जबड्यात अडकत चालला आहे.महागाई वाढली पण पगार देखील वाढलेच कि..जे जमणार नसेल त्याच्यापाठी लागून आलेले सोन्यासारखे दिवस आणि क्षण फुकट घालवले जातात.किती तो कामाचा बोजवारा!!कधी कधी...

उंच जाई झोका !

इमेज
          हल्लीच ' उंच माझा झोका ' ह्या मालिकेचे भाग पाहण्यात आले . कै . रमाबाई रानडे ह्यांच्या आयुष्यावर रेखलेली हि मालिका . कुतूहल होते , कारण अनेकांकडून ह्या मालिकेचे नाव ऐकले होते म्हणून पाहण्याचा मोह झाला . उत्तम सादरीकरण आणि अभिनय , दोन्हीचे पाठबळ लाभलेली हि मालिका पाहायला सुरवात केली आणि मग काय ... पुढे पुढे पाहण्याची इच्छा , आणि रोज काहीतरी नवे शिकायला मिळते आहे असा अनुभव येत गेला . रमा बाईंचा जन्म ५ जानेवारी १८६२ सालातला .. त्यांनी त्या काळात स्वतः शिक्षण घेऊन स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला तसेच ' सेवासदन ' ह्या संस्थेच्या मुख्य कार्यकर्त्या आणि ' हुजूरपागा ' हि शाळा पुण्यात काढणाऱ्या सुधारक विचारांच्या रमाबाई , आणि त्यांचे पती न्यायमूर्ती . महादेव गोविंद रानडे ह्यांचे कार्य दाखवणारी हि ' झी मराठी ' वरील   मालिका आहे .        जुन्या स्वातंत्र्यपूर्व काळातले पुणे शहर , ते वातावरण , डोळ्यापुढे उभे केले आहे दि...