पोस्ट्स

जून, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"सुट्टी"

        "सुट्टी"शब्दाची जादूच अशी आहे कि सगळी मंडळी ती पडली कि एकदम खुश!सुट्टीचा आनंद काही वेगळाच.सक्तीची सुट्टी वेगळी पण घेतलेली सुट्टी,मग ती शाळेला सुट्टी असो,ऑफिसला किंवा घरकामाला, ह्या शब्दात एक मौज आहे.लहानपणी शाळेत जाणे,शाळेतला अभ्यास,शाळेतला खेळ आणि इतर शालेय उपक्रम,स्पर्धा ह्या व्यतिरिक्त आम्हां मुलांचे एक वेगळे विश्व नक्कीच होते.ह्या विश्वात जो वेळ मिळायचा तो नेहमीच कमी वाटायचा,"अजून थोडा वेळ आलेच ग आई","थोडे वाचते अजून","अजून खेळूदे न",हि अशी वाक्य आठवतात.          शाळा संपून लागलेली सुट्टी 'मे महिन्याची',दुसरी दिवाळी आणि मग गणपतीची सुट्टी ह्या सुट्टीतले कार्यक्रम सणासुदिशी निगडीत असत.घरात पाहुणे मंडळी एक वेगळेच उत्साहाचे सणाचे वातावरण.आम्हीं मुले ह्या वातावरणाचा एक भाग बनून जात असू.मग घरात मोठ्यांना कामात मदत करताना पण सुट्टी असल्याने एक आनंद मिळायचा.गणपतीत मोदक बनवायला आणि आपण बनवलेले मोदक खायला एक वेगळीच गम्मत वाटायची  गणपतीची आरास,आरत्या,प्रसादाचे जेवण,असा हा  मिळून साजरा केलेला गणेशोत्सव,काकांकडे सगळे जमत असू सुट...

'सुंबरान-सोनेरी दिवसांच्या आठवणी'.

इमेज
        हल्लीच एक चित्रपट पहिला,मराठी चित्रपट..पूर्वी असलेल्या मराठी चित्रपटांपेक्षा वेगळा असा.चित्रपटाकडून जेव्हां काही गोष्टी शिकायला मिळतात तेव्हां ती नुसतीच करमणूक राहत नाही तर चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर एक समाधान असते,काहीतरी मिळवल्याचा आनंद असतो!आजपर्यंत असे फारच मोजके चित्रपट पहिले आहेत ज्यातून खूप काही मिळाले,त्यातलाच श्री.गजेंद्र अहिरे दिग्दर्शित,'सुंबरान-सोनेरी दिवसांच्या आठवणी'.                  ह्या चित्रपटाची कथा,त्यातील पात्रे,त्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध,पिढ्यानपिढ्या जपलेल्या अश्या आणि आता जीर्ण झालेल्या वाड्याशी असलेली प्रत्येकाची भावनिक गुंतवणूक,नात्यांमधील सच्चेपणा आणि भूतकाळातील अनेक घटनांची वर्तमानात केलेली पेरणी,असा हा चित्रपट.ह्या कथानकातील काही पात्रे हि स्वतःचा भूतकाळ आपल्याला सांगत आहेत.वर्तमानातल्या आजच्या त्यांच्या परिस्थितीला त्यांचा भूतकाळ हा कसा जबाबदार आहे हे आपणास हळू हळू उलगडत जाते.       अस म्हणतात,'जेव्हा विचारांच्या शृंखला होतात,काह...

! शाश्वत !

इमेज
 सहजच कधी ह्या वाटेवर     'अनोळखी'बनून तरी एकदा,    उतरू देत तुझी पाऊले.    मग सापडतील मला,    माझे हरवलेले क्षण.    कितीही वाटले,       मनात मळभ  दाटले  तरीपण,                   थोडक्यात  निवांत  बोलू,भेटू,रडू .......       ओळखीचेच हसू पण'खरे'.           तुझ्यामाझ्यात अंतर कधी वाढलेच  नव्हते        पडलाच नव्हता ग, कुठे घाव         साधले होते सगळे सगळे भाव       एका रेषेत सरळ,चालत आयुष्य होते.         पण सगळीच'पूर्णता'नको म्हणालीस,      उतरून गेलीस'हृदयाचा जिना.      'परत न येण्याचे'दिलेस वचन        खात्रीने स्वतःची काळजी घेण्याचा      घेतलास'पण',     ...

'शब्द' माझी एक कविता......

इमेज
शब्द,पाऊल पाऊल उचलता,भारावले. वेडेपिसे पसरले,     अंगी अंगी शहारले... शब्द रुतले अंतरी    अन काळीज हेलावले भाव नेत्री ओथंबले      शब्दाळले,ओलावले... शब्द रुपेरी चंदेरी    असा नृत्य भास सारा. आणि हसरे आनंदी    खेळविती ह्या मनाला. शब्द नाठाळ चावट,  शब्द कधी आरोपिती. वेडे भन्नाट रागिट, कधी मनात दडती. शब्द भावभावनांचे.  असती स्वर अंतरीचे.  सापडले मौल्यवान   दूत असे हे मनाचे...    --श्रिया  -