पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" नेमेची येतो बघ ' पाववाला ' ! "

          "नेमेची येतो बघ 'पाववाला'!" ह्या वाक्यातला बदल, तुमच्या लक्षात आलाच असेल! पण हे अगदी खरे आहे हं! एक वेळ 'पावसाळा' मागे पुढे सुरु होईल पण 'पाववाला' मात्र अगदी नियमित येणारी व्यक्ती आहे.                                               शहरातून ठराविक भागात बेकरीतले काही पदार्थ सायकलवरून विकणारा हा 'पाववाला' आणि त्याची ती ठराविक हाळी ऐकली कि सवयीने सकाळी सकाळी लोक पैसे तयार ठेवतात. मऊ आणि कडक पाव, खारी आणि बटर शिवाय आणखीनही  बरेच गोड पदार्थ देखील हे आणून देऊ शकतात. नियमितपणा चुकलेला नाही ह्याला. पावसाळ्यात मुसळधार पावसात देखील हजेरी लावणारच.सायकल कोपऱ्यावर लावून अगदी गुढघाभर साठलेल्या पाण्यातून  चालत येणारा पाववाला पण पहिला आहे मी.ठरलेली घरे, ठरलेले पैसे ह्यासाठी इतकी धडपड! कधी एक शब्द जास्त बोललेला आठ...

शरद ऋतूचे देखणे दर्शन.....

इमेज
शरद ऋतू ,पानांचे वेगवेगळे रंग, आणि हवेतला गारवा , अश्या वेळी खूप सारी छायाचित्र  काढाविशी वाटली तर नवल नाही! रंगबिरंगी पानांना आणि निसर्गाला असेच कॅमेर्यात टिपून ठेवलेले काही क्षण ...Fall 2010

सांजगारवा....

'तिच्या' निजेला चंद्र हासरा रजनी गुणगुणते 'त्याचे' स्वर 'तिच्या' पापणी मध्येच दिसते ते 'त्यांचे' घर ते 'त्यांचे' घर.... लाल रुपेरी कौलारू परि, आणि नेटके सुरेख अंगण. अंगणी आहे तुळस आगळी प्राजक्ताचे सडे लांबवर... दरवाज्यावर तोरण हलते, रंग भिंतीचे, 'त्याचे' मीपण. सुगंध उदबत्तीचा येता विसरून जाते 'ती' 'तिजला' पण... खिडकीपाशी,पडदे निळसर, सर्व असावे मनाजोगते 'त्याचे' हास्य अन 'तिचे' लाजणे अल्लड,अवखळ आणि निर्मळ.... यावा नेहमी 'सांजगारवा' हरवून जावी सारी कलकल फक्त उरावे 'दोघांमधले' क्षणिक अंतर क्षणिक अंतर.... -श्रिया (मोनिका रेगे)-

'दूरदर्शन शाप कि वरदान?'

          लहानपणी  शाळेत असताना निबंधाचे विषय मिळायचे आणि एक त्यातला आठवतो ''दूरदर्शन एक शाप कि वरदान?'त्यावेळी लहान होते आणि अर्थात दूरदर्शनचे आकर्षण नवीन असल्यामुळे खूप वाटायचे अश्यावेळी त्या निबंधात मी काय लिहिले असेल ह्याचा तुम्हीं अंदाज लावू शकालच! त्यावेळचे काही लक्षात राहिलेले कार्यक्रम म्हणजे छायागीत,गजरा, चिमणराव आणि नंतर जेव्हां हिंदी कार्यक्रमांना सुरवात झाली तेव्हां चे 'नुक्कड','ये जो हैं झीन्दगी' हे काही कार्यक्रम आठवतात.तेव्हां दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम आणि मग रात्री ठराविक वेळ दिल्ली दूरदर्शन चे कार्यक्रम असत.             सद्यस्थिती पाहता,दूरदर्शन वरील वाहिन्या,आणि त्यावरील वेगवेगळ्या मालिका हा एक मोठा चर्चेचा विषय आहे,TV सेट आज घराघरात दिसतात एक वेळ 'तुळशी वृंदावन' दिसणार नाही पण TV मात्र आहेतच.. सर्वांचेच विश्व ह्या TV भोवती थोड्या बहुत प्रमाणत फिरते.. मोठ्यांना नोकरी व्यवसाय सांभाळून,जो वेळ मिळेल त्या वेळात आवडत्या मालिका बघणे हा एक रोजचा कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम चुकतच का...