पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री गुरूदेव दत्त !

इमेज
  आज श्री दत्त जयंती. बालपणी आम्ही चौल भोवाळे येथील दत्ताच्या जत्रेला जात असू. बालपणीच्या विश्वात जत्रेला जाणे म्हणजे एक आनंदाचे देणे असायचे.मोठ्यांच्या सोबत कधी बैलगाडीतून,कधी रिक्षा,काही प्रवास पायी,आणि मग देवळापर्यंत पायऱ्या.अर्थात आमचे लहानगे जग त्या जत्रेतील वेगवेगळी आकर्षणे,विविध खेळ,डोंबारी,माकडाचे खेळ,भिंगर्या,फुगे,पिपाण्या, उसा चा रस,लाकडी खेळणी,काचेच्या बांगड्यांची दुकाने त्यांचा पेट्रोमॅक्सच्या पिवळ्या प्रकाशात होणारा चमचमाट डोळ्यात भरून राहायचा! जादूचे प्रयोग तेही असायचे.'मौत का कुआँ' ह्यात,आम्ही सर्व जण एक खोल लाकडी विहिरीसारख्या गोल आणि खोल जागेभोवती बाकडी, मंडप टाकून बसलेलो असायचो आणि एक किंवा दोन मोटरसायकल स्वार त्या लाकडी विहिरीत त्यांच्या गाड्या न आपटता, न पाडता गोल गोल फिरवायचे.ते पाहताना अचाट कौतुक वाटायचे त्यांचे!आम्हा लहान मुलांना,"बच्चे कंपनी ताली बजाव "असा आदेश आला की तिथे जोरदार टाळ्या वाजायच्या.  खारे शेंगदाणे,चणे फुटाणे,चना चोर गरम,भज्यांचे विविध प्रकार ह्यांचा घमघमाट हवेतल्या गुलाबी थंडीत पसरलेला असायचा! चहा कॉफीची लहान टपरी असायची.आम्ही जे...

भूमिका

इमेज
काल रविवारी ३० तारखेला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे दुपारी एका आगळ्या वेगळ्या नाट्य प्रयोगाला गेले होते. हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित क्षितिज कुलकर्णी लिखित असून ह्यात प्रमुख भूमिकेत श्री सचिन खेडेकर आहेत.नाटकाचे नाव 'भूमिका'. विषय मांडायला सोपा नाही असा..पण लेखकाने लीलया,मांडला आहे.आणि ह्यातील कलाकारांनी साभिनय उत्तम पेलला आहे! ह्या नाटकातील विविध संवाद मनाला खोलवर जाणवतात.आपल्या शेजारपाजारी,ओळखीत,नात्यात आलेले अनुभव,प्रेक्षकांना कोणत्या ना कोणत्या भूमिकेत न्हेऊन उभकरतात.लेखकाला जे म्हणायचे होते ते,प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते. काही प्रसंग,संवाद थेट मनाला भिडतात! प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका चोख बजावली आहे.नेपथ्य आणि रंगभूषा छानच. नाटक कुठेही कंटाळवाणे वाटत नाही,उलट विचारप्रवर्तक आहे.नक्कीच पहाण्यासारखे ! ह्यातील समिधा गुरु,अतुल महाजन,सुयश झुंझुरके,जयश्री जगताप,आणि जाई खांडेकर ह्या कलाकारांनी सुद्धा उत्तम अभिनय केला आहे. येथे नाटकाचा विषय मी मुद्दाम देत नाहीये,कारण तो तसा परिचयाचा असला तरी नाटकातून लेखकाने सर्व प्रेक्षकांशी ह्या विषयावर जो संवाद साधला ...

कविता

इमेज
तू कविता वाचतोस तेंव्हा,ती,रंगते!  तिच्या शब्दाशब्दात अडकलेल्या भावना जागृत होतात.... तू कवितेला समजून घेतोस. लिहिताना कागदावर तिचे रूप;आणि तुझ्या शब्दात जेंव्हा तिला गुंफतोस तेंव्हाची ती,किती बदलते..  ऐकत रहावीशी वाटते!         ती थंडीची वाचतोस तेंव्हा,लपेटली जाते उबदार शालीसारखी भोवती.. पावसात काळा ढग बनून बरसत राहते,तुझ्या आवाजातील जादू,आणि कवितेचे शब्द,त्यांचे अर्थ..  हलके हलके वाटू लागते..जणू सगळे ताण एका क्षणात विरघळून जावेत तसे काहीसे!  तुझी कविता जेंव्हा उंबऱ्यावर रेंगाळते,तेंव्हा तिचे भांबावणे,भर दुपारी सावली शोधत हिंडते तेंव्हा, तिची होणारी तगमग...थंड वाऱ्याची झुळूक आणि तुझ्या कवितेच्या पानाचे मिटणे.. हिरवळ पसरलेली वाटते मनात! मग पुन्हा एक fresh day !! तुझ्या आणि तुझ्या कवितेचा ! -श्रिया Thank you Tumblr for beautiful picture.🙏 फोटो साभार आंतरजालावरून...

जर तरची गोष्ट

इमेज
बऱ्याच दिवसांनी ब्लॉग वर काही पोस्ट करते आहे. सध्या भारतात आहे.खूप वर्षांनी आले आणि खूप राहते आहे! ह्या भारत भेटी बद्दल जितके लिहावे कमीच आहे! आई बाबा बहिणी,सर्व नातेवाईक,आप्त सर्वांसोबत निवांत वेळ मिळाला,नेहमीसारखे धावपळीचे दिवस नाहीत त्यामुळे,भारतात नवीन अनुभव,भटकंती,अनेक उत्तम उपाहारगृहात घेतलेला पाहुणचार,नवीन ओळखी,काही सहली आणि ह्या सर्वाची खूप सारी छायाचित्रं साठवत जाते आहे. ही भारत भेट,माझ्यासाठी अनेक सुंदर अनुभव,आनंदाचे उत्साहाचे,उत्सवाचे वातावरण घेऊन आली.बाप्पाने दिलेली ही अमूल्य भेट आहे! महत्त्वाची जबाबदारीची कामे चालू आहेत.पण त्याच बरोबर क्षणभर विश्रांती मिळते,अशा उत्तम नाट्य कलाकृतीतून !     मध्ये एका शनिवारी ' जर तर ची गोष्ट ' २ अंकी मराठी नाटक पाहिले. खूप दिवस मी वाट पाहत होते की उमेश कामत,आणि प्रिया बापट ह्यांचे हे नाटक पुण्यात येते, आणि सगळे व्यवस्थित जुळून आले ते शनिवारी.  नाटकाचा विषय गंभीर असला तरी तो एका वेगळ्याच पद्धतीने सादर केला गेला आहे.२ अंकात हा विषय मांडणे तसे अवघड असूनही बऱ्यापैकी प्रेक्षकांपर्यंत त्यातला संदेश पोहोचला आहे.मला ह्या कलाकारांचे ने...