पोस्ट्स

डिसेंबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

! वर्ष २०११ चे स्वागत असो !

इमेज
                         परत एकदा येणारे नवे वर्ष हसून स्वागत करणारे,हात पसरून जवळ बोलावणारे आणि जुन्या वर्षाचा सर्वांना विसर पडलेला,तो क्षण,तो दिवस,जवळ,जवळ येणारा,त्या दिवसाची संध्याकाळ हवी हवीशी वाटणारी ३१ डिसेंबरची संध्याकाळ,नाताळचे दिवे आणि मग नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत, दर वर्षी ठरलेला हा सोहळा!                      किती सारे जुन्या वर्षाने आपल्याला दिले.काय आपल्याकडून घेतले?काही अवघड प्रसंग,अचानक झालेले लाभ,आनंदाचे अनेक क्षण,तसेच काहींना भेटलेले आघाताचे दुर्दैवी क्षण,काही तरी हरवल्याची जाण, कुठेतरी काही नसल्याची जाणवत राहणारी खोच, धनलाभ, वास्तु सुख,नवीन नोकरी, एक न दोन अनेक आनंदाच्या बातम्या! हे मागील वर्ष जाताना पूर्णपणे कधीच जात नसते, आपल्याला देऊन जाते फक्त येणारे नवीन वर्ष! पुन्हा एकदा चालून आलेली नवी संधी,परत एकदा एक नवी सुरवात,नवे संकल्प, जुन्या अनुभवांनी दिल...

बयो...एक अप्रतीम चित्रपट!

इमेज
                                    तळकोकणातल्या एका गावातली ही प्रेमकथा,दिग्दर्शकाने इतकी जिवंत केली आहे कि अक्षरशः पूर्ण चित्रपटात आपण ती कथा जगतो.कुठेच कंटाळवाणा होत नाही हा चित्रपट,कारण अतिशय सुंदर मांडणी केली आहे.प्रसंग पण छान गुंफले आहेत.शिवाय मध्ये मध्ये शास्त्रीय संगीताची जोड आणि कोकणचा निसर्ग! दिग्दर्शक,श्री गजेंद्र अहिरे ह्यांनी प्रेक्षकांना बरच काही दिले आहे ह्या 'master piece ' मधून;असे वाटले.          सर्व कलाकारांनी अप्रतीम भूमिका केल्या आहेत..सौ.देशमुख' ह्या लेखिकेच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहेत.नवऱ्याच्या दूतावासातल्या नोकरीमुळे लंडनला आलेली रावी देशमुख,खूप एकटे वाटत असते तिला घरी.परत मायदेशी जावेसे वाटत असते,भारतात असताना नोकरी करणारी रावी इकडे घरी पूर्ण वेळ रिकामी असल्याने कंटाळते,'लिहिणे' हा तिचा छंद,२ पुस्तके तिची प्रकाशित झालेली असतात.श्री...

वाचू आनंदे !

           प्रश्न आणि उत्तरे ह्या सगळ्याचा खेळ आहे शेवटी जीवन म्हणजे....आणि एका प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण करत राहतो आपण.एकदम सगळे सगळे बदलून टाकण्याची खुमखुमी असते न आपल्यात! मनासारखे झालेच पाहिजे आणि नाही झाले तर मग खूप वाईट वाटते.नव्या उमेदीने परत एकदा प्रयत्न करणे कमी जमते  कारण असा पण विचार करतो कि इतकी मेहेनत पाण्यात गेली आणि मग नकारात्मक वृत्ती सकारात्मकतेला मागे टाकू लागते...अश्या वेळी खरच लागतो एक मदतीचा हात, आता हा हात नेहमीच मिळेल असे नाही पण आपले रोजचे व्यवहार,त्यातले येणारे नावडते अनुभव,ह्या सर्वातून आपण एकटेच मार्ग काढत असतो कि! मग कधी अचानक आलेल्या मोठ्या प्रश्नाला पण आपणच सामोरे का जाऊ नये? उत्तर शोध म्हणजे सापडेल! पण कसे शोध, तर मनातून सर्वप्रथम सगळे नकारात्मक विचार काढावेत.तरच योग्य तऱ्हेने उत्तर जवळ येऊ शकेल.                       मध्ये एका लेखिकेचा एक लेख वाचनात आला होता.इतके छान लिहिले होते ...