पोस्ट्स

एप्रिल, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"कुठे काही चुकते आहे का?"

इमेज
                मनात किती वेळा हा विषय येऊन गेला.ह्या विषयावर लिहायचे म्हणजे कमीच आहे!पण लिहायचे आज मनात होते म्हणून हा प्रयत्न!कुठे काय चुकते आहे ते कळण्यास मार्ग नाही पण नक्कीच काहीतरी चुकत जाते.आणि ह्यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.            आजोबांचा प्रेमळ धाक आठवतो.त्यांनी शिकवलेली रामरक्षा,श्लोक,पाठांतर,एक प्रकारची शिस्त. घरातले वातावरण आजी आजोबांमुळे आमच्यासाठी खूप वेगळे होते.लहानपण त्यांच्या सोबत कसे उमलून आले आणि अनेक उत्तम संस्काराची बीजे कशी पेरली गेली आमच्यात ते आज जाणवते.त्यांचे घरातले महत्व अनन्यसाधारण होते हे नक्की.मी असा विचार करू शकत नाही कि आमचे घर आणि त्यात मी आई बाबा आणि आम्हीं बहिणी अर्थात,आता आजी आजोबा नाहीत पण ते असताना जो घरात ओलावा होता,त्यांच्यामुळे जे चैतन्य होते ते,आम्हां सर्वांमध्ये नक्कीच उतरले आहे.           'वृद्धाश्रम,ह्या नावात सगळे आले का? 'घरात नको' म्हणून,'निरुपयोगी' म्हणून,असे अनेक शब्द अ...

'शेवटास न गेलेली गोष्ट'

इमेज
                                'शेवटास न गेलेली गोष्ट' हि कल्पना आवडते सर्वांनाच.अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यन्त.आता मोठ्यांपर्यन्त येव्हढ्याचसाठी म्हणाले कारण आज कालच्या दूरदर्शनवरील मालिका जवळ जवळ न संपणारी गोष्टच असतात नाहीका! कारण मग जेव्हां त्या संपतात तेव्हां,तोवर उत्सुकता पण संपलेली असते सर्वांचीच....              नक्की माणसाला हि 'शेवटास न गेलेली गोष्ट' का बरे आवडत असावी? दर वेळी नाविन्य असलेली, आजीने सांगितलेली गोष्ट आठवली. रामायणात शेवटी 'राम राज्यावर बसला' अस जेव्हां ती म्हणाली होती तेव्हां तितकेसे ते पटले न्हवते.इतक्यातच कसे रामायण संपेल?आणि त्यात 'राम राज्यावर कसा बसू शकेल?' आजीला शब्दात पकडून भंडावून सोडलेले आठवते आहे,आजीची मग तारांबळ उडायची.एक तर आधी तिला कोकणी यायचे आणि मराठी कोकणी अशी ती गोष्ट रंगायची..पण तरीही मग वेगळी गोष्ट हवी असायची अगदी झोपेपर्यंत,म्हणायला, ऐ...