पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'श्रेय '

इमेज
                   मी हरवलो आहे ग,पूर्णपणे...स्वतःला हरवून बसणे आणि ते सुद्धा मुद्दाम,हट्टाने,का ते माहित नाही..."सगळ्या प्रश्नांना उत्तरे असतात" हे माझेच वाक्य आहे आणि तुला ते नक्कीच आठवत असेल हे ऐकताना .. उत्तरे असतील,'कारणे'नसतात.'धडा शिकणे' आणि पुढे त्या वाटेकडे न झुकणे हे खूप कठीण असते पण करावे लागते.स्वतःला समजावताना किती महिने गेले असतील...विचार आणि प्रश्न ह्यांच्या गुंत्यात अडकून तोच तोचपणा आला होता.पण हे सगळे नाकारणे म्हणजे स्वतःशी अन्याय करणे झाले असते.खेचाखेची झाली मनात आणि शेवटी खूप ताण आला आणि दोरी किंचित उसवली....तिच्या तुटून हलक्या झालेल्या धाग्यांना काहीच इलाज नाही.दोरी परत तशीच्या तशी नाही होऊ शकणार कधी हे निश्चित.ह्या निर्णयापर्यंत नकळत यावेच लागले.स्वतःला फसवत राहता येणार नव्हते. आशा आणि निराशा ह्यात किती कमी जागा असते हे लक्षात आले.मला 'गद्य' लिहिता येत नसले तरी एक प्रयत्न करतो आहे आज,फक्त तुझ्यासाठी.        आज,'फिरून तुझी आठवण' ह्या माझ्या काव्य संग्रहाला पारितोषिक मिळाले...ते घे...