पोस्ट्स

सप्टेंबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाणता राजा...

इमेज
आपल्या प्रत्येकात एक 'शिव छत्रपती' आहेत....सध्या कुठे हरवले आहेत ते ? महाराष्ट्राचे सोने करणारा,खरया अर्थाने महाराष्ट्राला जागे करणारा,चैतन्य देणारा आणि स्वातंत्र्य देणारा असा आपला राजा.....आज ह्या राजाची भारताला गरज आहे. सच्चाई,सचोटी,न्याय,खलांचे निर्दालन,शौर्यं, धिटाई,सर्व गुणांच्या एकत्रीकरणासाठी त्या जिजाऊला किती मेहेनत घ्यावी लागली असेल! आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली ती एक आदर्श माता,महाराजान मधला कणखरपणा, आणि स्वातंत्र्याबद्दलची ओढ,निर्माण करणे हे जणू तिचा जिवित उद्देश्य होते. आज आजूबाजूला आपल्या देशात अन्यायपूर्ण अश्या अनेक गोष्टी घडताहेत.वर्तमानपत्रातली पाने हि अश्या बरयाच बातम्यांनी भरलेली असतात ज्या वाचून मन अस्वस्थ होते.... सगळीकडे 'भ्रष्टाचाराचे राज्य'...हा आपला शत्रू इतक्या सहजपणे देशात घुसून आतल्या आत देश पोखरतो आहे...."सगळी सिस्टिमच जर बिघडली असेल तर मग मी एकट्याने बदलून काय होईल?" असा मुलभूत प्रश्न सगळे एकमेकांना विचारतात जेव्हां असे विषय चर्चेत येतात. सर्वांसाठी केलेले असे स्वतःचे असे राज्य जे स्वराज्य ते प्रत्येकासाठी आहे;...